Shree Swami Samarth Nam:

|| श्री स्वामी समर्थ ||


|| गणेश गीता ||


॥ अध्याय तिसरा - विज्ञानप्रतिपादनः ॥


(गीति)
गणेशपुराण यांतिल, गणेशगीता प्रसंग हा तिसरा ।
सूत मुनींना सांगति, गणपति सांगे नृपाल या तिसरा ॥१॥
गणपति म्हणे वरेण्या, पूर्वी जी प्रथम होत उत्पत्ती ।
१.
त्या वेळीं त्रिगुणात्मक, ब्रह्मा विष्णू महेश हे होती ॥२॥
ज्या योगानें तीनहि, मूर्ती होती जगांत निर्माण ।
त्या योगानें तीनहि, गुण वसती हरि हरादि विधि जाण ॥३॥
ऐसा विष्णू जाणुन, त्यासी जो मीं निवेदिला योग ।
विष्णूपासुन रविला, त्यापुढती त्या सुतास कथिं योग ॥४॥
वैवस्वत विष्णूचा, सूत असे त्या मनू असें म्हणती ।
त्यापासुन ऐकूनि तो, योग पुढें कीं मनी जगा कथिती ॥५॥
विज्ञानप्रतिपादन हा, योग असे तो परंपरा येत ।
२.
कथितों वरेण्य भूपा, प्रियकर माझा सुभक्त तूं होत ॥६॥
कालगतीनें भूपा, विश्वासासी तसाच श्रद्धेस ।
३.
झाला अपात्र म्हणुनी, गुप्तच होता बहूत तो दिवस ॥७॥
यापरि गुप्त असे तो, योग तुला सांगतों श्रवीं राया ।
हितकर फार असूनी, वेदांचें सार सर्व आहे या ॥८॥
पूर्वी तुजला कथिला, होता तो योग सांगतों ऐक ।
४.
झाला स्तब्धच भूपति, ऐकून ऐसें सुभाष्य क्षण एक ॥९॥
पुसतो भूपति प्रभुला, सुलीन वाचे पुढील प्रश्नांनीं ।
अपुला जन्महि झाला, श्रविलें मीं लिंगगर्भ या स्थानीं ॥१०॥
ऐसें असून म्हणतां, पूर्वी हा योग विष्णुला कथिला ।
५.
गूढार्थ स्पष्ट करुनी, म्हणतां हा सांगणें प्रभू मजला ॥११॥
गणपति भूपा सांगे, मज तुज झाले अनेक ते जन्म ।
६.
तुजला स्मरतच नाहीं, मजला स्मरती समस्त ते जन्म ॥१२॥
विष्णूआदी करुनी, मजपासुन ते समस्त सुर होती ।
७.
युगिं युगिं जन्मा येती, अंतरबाह्यहि मदीय ते विरती ॥१३॥
श्रेष्ठ असा ब्रह्मा नी, आहे तैसाच तो महादेव ।
८.
स्थावर जंगम सारें, विश्वहि मी कीं असेंच तें सर्व ॥१४॥
जनन मरण नसे तीं, अनादि आत्मा असेच ईश्वर मी ।
९.
त्रिगुणात्मक मायेचा, आश्रय घे जनन बहुत योनी मी ॥१५॥
जेव्हां अधर्म पसरे, धर्माचा र्‍हास होतसे तेव्हां ।
१०.
साधू रक्षण करणें, दुष्टनिवारण करीतही तेव्हां ॥१६॥
यास्तव मजला लागे, जन्मुन यावें तदर्थ महिवरती ।
११.
नानाविध लीलांनीं दुष्टांचे नाश करुनि बहु रीती ॥१७॥
स्थापावें धर्माला, नाश करावा अधर्म हें कार्य ।
यास्तव अवतारुनी, भूवरि येणें तदर्थ हें राय ॥१८॥
मुनिगणसाधू यांचें, पालन करणें प्रमूख हें कार्य ।
वर्णाश्रमधर्माला, रक्षावें हें अधींच जनकार्य ॥१९॥
युगिं युगिं अवतरणें हें, जाणे जो त्या त्वरीत अवतारा ।
१२.
त्याला जन्म पुन्हा कीं, येतच नाहीं म्हणून मुक्‍त खरा ॥२०॥
ताठा ममता सोडुन, जाणे जो कर्म वीर्य ममरुपा ।
१३.
तो मुक्त सत्य होतो, जन्म न त्याला पुन्हां न ये भूपा ॥२१॥
निर्भय निरिच्छ असुनी, मजवर श्रद्धा करुन आश्रय ते ।
१४.
ज्ञानें तपेंच पावन, होउन येती समीप माझ्या ते ॥२२॥
ज्या ज्या भावें मजला, सेविति ते ज्ञानमुक्तसे योगी ।
१५.
तैशी तैशी त्यांना, फलप्राप्ती मी त्वरीतशा मार्गी ॥२३॥
माझे अनुयायी जे, होती ते मदिय मार्ग अनुसरती ।
१६.
अपुल्या व दुसर्‍यांच्या, कर्मांमाजी समानसे असती ॥२४॥
जे जे मानव करिती, या लोकीं जें सहेतुकें कर्म ।
त्या कर्मानें तोषित, इच्छितसे देव होति हें वर्म ॥२५॥
देती त्वरीत त्यांना, कर्माचें तें सुयोग्य फल राया ।
१७.
ऐकें पुढील भाषण, श्रवण करीं बा सुशांत राहुनियां ॥२६॥
सत्त्व-रज-तमापासुन, या लोकीं चार वर्ण निर्मियले ।
१८.
या वर्णांचें मिश्रण, कथितों तुजला समग्र तें पहिलें ॥२७॥
परंतु कर्मापासुन, जे गुण होती जनीत त्यांनीं ते ।
१९.
नित्य अलिप्त नि ईश्वर, मजसी बुधजन आणिक ते ॥२८॥
कर्ता आणि अकर्ता, म्हणती ऐसें अनेक नामांनीं ।
नामें प्रमूख माझीं, ऐकें भूपा सुशांत कर्णांनीं ॥२९॥
निरिच्छपणिं जो जाणे, अपुल्याला कोण आपण आहोंत ।
२०.
तो कर्मबंधनानें, होतच नाहीं सुबद्ध म्हणतात ॥३०॥
यास्तव पूर्वीचें तें, कर्म करीती मुमुक्षुजन सारे ।
कर्म प्राधान्य असें, मानिति तें तत्त्व साच भूपा रे ॥३१॥
ज्याला अज्ञानाचें, बंधन आहे सहेतुकें भव हा ।
ऐसें जाणून येतां, होतो तो मुक्‍तकारणीं या हा ॥३२॥
कारण ज्या ठायीं ते, बुद्धी कूशल महर्षिही भुलती ।
(गणेशगीता श्लोक २१ व २२)

यास्तव कर्म अकर्महि, तुजला कथितों सुबोधशा रीती ॥३३॥
कर्म अकर्म नि तिसरें, विकर्म यांचें मुमुक्षुंनीं तत्त्व ।
तिनीं समजुन घेण्या, योग्य असें सांगतों पुढें तत्त्व ॥३४॥
या तीनीं कर्मांची, आहे गति ती बहूत गंभीर ।
२३.
आहेस भक्त यास्तव, कथितों तुजला समर्थ साच तर ॥३५॥
जें ज्ञान क्रियेमाजी, अक्रियतेचें असें असे तें हें ।
अक्रिय गोष्टीमाजी, क्रिय गोष्टींचें दिसोन येतें हें ॥३६॥
ऐसें ज्ञान जयाचें, कर्म करुनिही अकर्मसें समजे ।
२४.
इहलोकांत तयांचें, कर्मापासून मुक्त तो समजे ॥३७॥
कर्मांकुर याच्या जो, कर्मारंभ करी वियोगानें ।
२५.
ज्ञाते म्हणती आहे, सक्रिय तो तत्त्वदर्शि या ज्ञानें ॥३८॥
साधनविरहित मानव, तृप्त निरंतर त्यजील फल हेतू ।
२६.
ऐसें कर्म करी जयिं, तयिं लाभे फल सुयोग्य जाणें तूं ॥३९॥
त्यागी निरिच्छ मानव, आत्मा जिंकी जरी करी कर्मे ।
२७.
त्यापासुन तरि पापी, नच होई तो करुनियां कर्मे ॥४०॥
मत्सर द्वेषहि दोनी, सोडुन हे भाव सर्वदा सम त्या ।
सिद्धि असिद्धी दोनी, मानी मानव करुन कर्मा त्या ॥४१॥
कर्म करुनियां मानव, बद्ध न होई मिळेल फळ त्यांत ।
२८.
तोषित राहे मानव, त्या योगें भूपती तुला कथित ॥४२॥
विज्ञानयुक्त ज्ञानी, सर्वस्वीं विषय मुक्तसा आहे ।
२९.
याज्ञिक कर्म तयाला, बाधक नोहे सुलीनता लाहे ॥४३॥
याज्ञिक अग्नी आणिक, होमाचे नी तसेच हवनाचे ।
अर्पिति मजला द्रव्या, ब्रह्माला पावतें नृपा साचें ॥४४॥
कारण कर्म असें तें, ब्रह्मार्पण बुद्धिनेंच तें करिती ।
३०.
यास्तव कर्माठायीं, याज्ञिक ते सर्वदा नृपा रतती ॥४५॥
कांहीं योगी दैवा, मानिति साचे तयास हा यज्ञ ।
३१.
कांहीं योगी अग्नी, ब्रह्माला रुपधारिसा यज्ञ ॥४६॥
निग्रहिरुपी अग्नी, त्यामाजी हवन इंद्रिया करिती ।
३२.
इंद्रियरुपी अग्नी, त्यामाजी विषय ते हवी देती ॥४७॥
पंचप्रान नि इंद्रियं, यांचीं कर्में समर्पिती कांहीं ।
३३.
ज्ञानें प्रकाशरुपी, आत्मा अग्नीच मानिती त्यांही ॥४८॥
द्रव्यें तपें नि कोणी, स्वाध्यायानें मदीय पूजन हें ।
३४.
करिती तसेंच यति ते, ज्ञानानें यजन करिति भूपा हें ॥४९॥
प्राणांत अपानाची, गति तैशी ती निरोधिती ज्ञानी ।
अपान वायूमध्यें, प्राणाची ती निरोधती ज्ञानी ॥५०॥
प्राणायाम म्हणावें, भूपा या नियमबद्धशा कृतिला ।
सांगेन अतां पुढें ती,ऐकें साद्यंतशा पुढें विधिला ॥५१॥
प्राणादिक वायू हे, जिंकुनि गतिचें तयांत तें हवन ।
करितात यज्ञ ऐसा, त्यायोगें पाप नाश तें करुन ॥५२॥
नाना प्रकार परिंनीं, ज्ञानी करिती बहूतसें यजन ।
३५/३६.
यज्ञीय शेष भक्षुनि, ब्रह्मपदालागिं पावती यजुन ॥५३॥
यज्ञ करित जे नाहीं, त्यांना हाही मिळेच ना लोक ।
३७.
त्यांना मिळेल कोठुन, तदितर दुसरा मिळेल का लोक ॥५४॥
वेदानें कथिलेले, कायिक वाचिक तृतीय मानसिक ।
३८.
जाणुन घेउन तीनी, करितां तूं मुक्त होसि हें ऐक ॥५५॥
सार्‍या यज्ञांमाजी, मान्य असे ज्ञानयज्ञ मज राया ।
मोक्षाला साधन तो, नाशक आहे समस्त कर्मां या ॥५६॥
नाशुन कर्मां सार्‍या, मोक्षाला ज्ञानयज्ञ नेत असे ।
३९.
यास्तव त्याला जाणुन, करणें अभ्यास सर्वदा परिसें ॥५७॥
सत्पुरुषांना वंदुन, सेवुन नंतर पुसे तयां ज्ञान ।
४०.
तत्त्वज्ञानी असती, सांगति सत्वर सुयोग्यसें ज्ञान ॥५८॥
नाना संग करी जो, सेवित नाहीं कधींच संतांस ।
४१.
तो बद्ध असा होतो, भवपाशानें सदैव हें परिस ॥५९॥
सद्‌गुण प्राप्ती होते, साधुसमागम घडे सदा राया ।
४२.
दुःखें नाशुन सारीं, इहपरलोकीं स्वहीत साधाया ॥६०॥
आहेत सुलभ सारीं, इतर तशीं साधनें करायास ।
साधुसमागम दुर्लभ, आहे यास्तव करी प्रयत्‍नास ॥६१॥
साधूंपासुन लाधे, ज्ञान खरोखर सुबोधसें राया ।
४३.
बंधन पावत नाहीं, भवपाशांनीं अनेक कर्मां या ॥६२॥
इतुकें झाल्यानंतर, ज्ञानानें सर्व भूत आत्म्यांत ।
४४.
दिसती मनुजा ऐकें पापी असुनी तरीहि तो मुक्त ॥६३॥
जैसा अग्नी भस्मचि, या लोकींच्या प्रसिद्ध वस्तूंचें ।
४५.
करितो त्यापरि तैसा, ज्ञानाग्नी हा घटीत कर्मांचें ॥६४॥
ज्ञानाइव दुसरी ती, वस्तू पावत नसेच भूपा ही ।
४६.
ज्ञानाच्या योगानें, कांहीं कालें स्वआत्मता लाही ॥६५॥
भक्‍तीयुक्‍त असा तो, इंद्रियं जिंकी तयास हो ज्ञान ।
४७.
कांहीं कालें करुनी, सत्वर मोक्षास नेतसे ज्ञान ॥६६॥
भक्‍ती श्रद्धाविरहित, संशयवृत्ती असे सदा जो तो ।
४८.
प्राप्ती कल्ल्याणाची, नाहीं नी लोक दोन अंतर तो ॥६७॥
आत्मज्ञानी रत जो, संशयवृत्ती समूळ मावळली ।
४९.
कर्मे करीत असतां, बंधनकारक न हो कदा काळीं ॥६८॥
संशयरुपी ऐसें, अंतस्थहि तो असोन अज्ञानी ।
५०.
नाश करितसे योगी, तो त्यासी ज्ञानरुप खड्‌गांनीं ॥६९॥
विज्ञानप्रतिपादन हा, गणेशगीता तृतीय अध्याय ।
संपूर्ण असे झाला, करितों अर्पण प्रभूकृपा होय ॥७०॥
कवनेंरुपी शमि ती, अर्पी प्रभुला सुलीनसा दास ।
मोरेश्वरसुत नमितों, साष्टांगें करुन पादकमलांस ॥७१॥


॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||


Download pdf (संपूर्ण गीता )
मागचा आध्याय
गणेश गीता (मुख्य पान )
पूडचा आध्याय
Main Page(मुख्य पान )